२० एप्रि, २०१३

फेसबुक - वेगवेगळ्या नजरेतून

मुझे तो तेरी लत लग गई ........... 
                                             लग गई ......... .....
                                                                  जमाना कहे लत ये गलत लग गई !!!!!!!!!!!



इकडे आबाच्या ढाब्यात (अबू धाबी) आल्यापासून तशी फेसबुकाची सवय झाली.

नकोच , फोटो नकोच लावूया, उगाच कॉपी करून आपल्याच मित्रांना रिक़्वेस्त पाठवतात म्हणे. त्यापेक्षा फोटो रिकामा  ठेवलेला बरा.

अरे बापरे, त्याच्या फोटोला किती लाईक आले. अगदीच फ़ेमस आहे रे तो ! ३ हजार मित्र आहेत त्याचे  फेसबुकवर ? ओ नो !!!

त्यापेक्षा  असं करू का, माझे मित्र इतरांना नको रे दिसायला. उगाचच प्रायवसी जाते.

त्यांचं  काय, बघावं  तेव्हा सारखे नुसते इकडे -तिकडे ट्रिपा  काढत  असतात आणि आले की  टाकतात फोटो फेस्बुकावर. उगाचच फ़्रस्ट्रेशन येतं  ते फोटो बघुन. आमचं कधी फिरायला जाण होतंय देव  जाणे. लाईक तर करूया.

नाहीतरी  दिवसभर घरी काही काम असते का? सारखं उगाच काहीतरी पोस्टत असतात. उगाचच पान  भरून जातात.

फोटो खरच छान  आहे पण  लगेच नको लाईक करायला नाहीतर वाटायचं सारखं फेसबुकवर पडीक असते. नंतर सवडीनं करु.

पण मी म्हणतो,  आपलं  व्यक्तिगत आयुष्य दुसऱ्यांसमोर कशाला उघडं पाडायचं, पर्सनल फोटो नकोच. बाकी काय ते टाकू.

नाही …………… नाही! ……………………… ………………. मी काही त्यातला नाही हं! आमचे फोटो म्हणजे सामाजिक, नैसर्गिक, वैचारिक  असतात कारण आमचा ग्रुप वेगळा आहे ना? आमचं  आपलं वेगळं हं!

ऑफिसातही बघावं तेव्हा स्टाफ निम्मा  वेळ  एफ बी वरच असतो म्हणे.

त्याचं / तिचं स्टेटस सिंगल आहे की कमीटेड कि इंगेज्झ.  रिक्वेस्ट पाठवू का?

माझं नाही रे बाबा तसं, रात्री फक्त एकदा अपडेट्स चेक करतो इतकंच. वेळ कुठे असतो?  एखादा  महत्वाचा निरोप चुकला तर म्हणून आपलं  चेक करतो इतकच.

फेसबुक तर हल्ली चर्च चे फादरच झालेत. कोटेबल कोट्स आणि देवादिकांच्या तसबिरी, हे लाईक करा म्हणजे चांगली खबर ऐकायला मिळेल वगैरे- वगैरे. जनरल नॉलेज मध्ये भर पडते म्हणे.

कोटेबल कोट्स रोज वाचायचा कंटाळा आला तरी त्यातला एखादा आपल्या रोजच्या दिनक्रमात घडलेल्या प्रसंगांशी  मिळता-जुळता  असला कि आपण पटकन लाईक करतो वा  कम्मेंटतो.

काय करू सकाळ झाली की सर्व कामे उरकल्यावर हात आपोआप कम्पुटर कडे वळतात. फक्त पाचच मिनिट करता -करता कधी अर्धा-एक तास निघून जातो ते कळत हि नाही.

मुलाबाळांची मेडलं- प्रशस्तिपत्रक पोस्टताना मात्र आई-वडीलांच्या अंगावर मुठभर मांस अधिक चढतं हे मात्र नक्की.

या वर्चुअल जगाचा एक मोठा फायदा म्हणजे आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी जगातून कुठेही जोडलेले राहतो हे मात्र खरं. पण हे खरच वर्चुअल असतं नाही ? यात फक्त आनंद व्यक्त केला जातो, पण आतला मत्सर, रोजचं दु:ख, टेन्शन, चिडचिड, एकमेकांबद्दलचे हेवेदावे  बाहेर येवू दिले  जात नाही किंबहुना येवू देवू नये हेही नसे थोडके. 

२ मार्च, २०१३

मी ……. आणि माझं वर्तुळ


आपलं  आयुष्य म्हणजे एक वर्तुळ असतं  नाही!!!!



कुणाला  परिघात घ्यायचं ,
कुणाला परिघावरच ठेवायचं
आणि कुणाला अगदी  परिघाच्या बाहेर.… थोडंसं लांब ……….खूप  लांब ……… आपणच ठरवतो.

परीघावरच्या बिंदूंना आत प्रवेश मिळायला थोडा वेळ लागतो खरं, तर कधी काही बिंदू  अजाणतेपणे हळूच शिरकाव करतात
काही बिंदू आपले-आपण न सांगता परिघाबाहेर जाणं पसंत  करतात
पण काही बिंदूंना मात्र कायम परिघावरच राहण्यात समाधान मानावं लागतं.

परिघातल्या बिंदुंनाही केंद्राबिंदुच्या(स्वतः च्या) किती जवळ आणायचं तेही आपणच ठरवतो.
बिंदूंची   अधिक-वजाबाकी करणंही सोपं असतं,
गुणाकार करताना मात्र थोडा वेळ लागतो
पण भागाकार करतांना दुसऱ्याच्या मनाचे किती सारखे तुकडे झाले याचा मात्र कमी विचार करतो.

केंद्रबिंदूपासून वर्तुळातल्या किंवा  वर्तुळा बाहेरच्या प्रत्येक बिंदुला सरळ रेष काढली तर
काही रेषा पुसट दिसतील तर
काही खूपच गडद भासतील.
काही त्रिज्या बनतील तर
काही दोन्ही टोकाला मिळून व्यास बनतील आणि मध्ये मात्र केंद्रबिंदू होरपळत राहील.

पण अशा  आजपर्यंतच्या किती अगणित रेषा तयार झाल्यात  वा होतील
पण केंद्राबिंदुमात्र  एकच राहील- एकच राहील अगदी  शेवटच्या श्वासापर्यंत.

आणि केंद्रबिंदूच नष्ट झाल्यावर बिचारे आतले बिंदू पुन्हा बाहेर पडतील दुसऱ्या  नवीन  केंद्र-बिंदूच्या शोधात . 

२५ फेब्रु, २०१३

फ्रीज - झुरळांचं माथेरान

इकडे  आबाच्या ढाब्यात .............अबुधाबीत हं!!!!
  (आबाचा ढाबा -पुण्यातले लक्ष्मी रोडवरचे मराठमोळे जेवण मिळणारे हॉटेल तसेच अबू धाबीला, आम्ही दिलेले हे मराठमोळ नाव ) दिवाळीत इकडे पुण्यासारखी मजा नाही आली, न फटाक्यांची आतषबाजी, न घराबाहेर आकाशकांदिलांची डोकावणारी रंगीत रांग. दिवाळी वाटली ती आपल्या घरी आणि सोबतच्या मित्रपरीवारासोबतच. तशी अबू धाबी, दुबई-शारजाच्या मानाने थोडी reserved emirate वाटते. दुबई शारज्यात म्हणे मुंबई पुण्यापेक्षा मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होते. क्वचित इथला राज्यकर्ता थोडा कडक असावा. त्या राजाचे नाव काय माहिती आहे का शेख खलिफा बिन झायेद बिन सुलतान अल नयान. कितीही लक्षात  ठेवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही.

दिवाळीत  फराळाचा आनंद मात्र घेता आला कारण थोडाच करावा लागला नं !  कारण ताट देणे-घेणे कमी होते. फटाके वाजवता आले नाही ते एक प्रकारे बरे झाले कारण त्यामुळे होणारे प्रदषण, भाजल्यामुळे काहींना गमवावे लागणारे प्राण, किंवा आलेले अपंगत्व, आणि मुख्य म्हणजे फटके बनवताना फक्त आणि फक्त वापरले जाणारे चिमुकल्यांचे हात, त्यामुळे त्यांना होणारे श्वसनाचे आजार या सगळ्यांचा विचार करता एक प्रकारे बरेच झाले.   
 
तसे इथले वातावरण गरमच. त्यामुळे इथल्या दमट  वातावरणात झुरळे ही  ओघाने आलीच. झुरळ - नाव जरी तोंडात आलं तरी 'ईआक ' व्हायला होत. इथल्या गरम वातारणात झुरळांची साईझ ही मोठी होत असावी. पण स्वयंपाक घरातली स्त्री आणि झुरळ याचं नातं कितीही नाही म्हटलं तरी कधी-कधी आमने-सामने होतच. झुरळांनाही आपल्यासारखे तेलकट-तुपकट-चमचमीत  आवडत असावच. गस ची नळी, ट्रॉली हा तर  त्यांचा लपायचं अड्डा. त्यात इमारत प्रकार असल्याने त्यांना एका घरातून दुसऱ्या घरात पाईपमधून त्यांची gang पसरायला वेळ लागत नाही. बायका जितक्या सोशिक, तितक्याच 
उंदरा-झुरळांच्या बाबतीत घाबरट. झाडू, चपला, पेपरच्या घड्या असली शस्त्रे वापरून त्यांचा संहार करणं  आपल्याला तर कधी जमले नाही . वरतून बायकांची खोचक बोलणी, ' उसने घर में पेस्ट-कंट्रोल किया है इसलीए  सब मेरे घर मे घुसे है ! '.

पण प्रत्येक वेळी paste control  करणे तसे  नेहमीच शक्य होत नाही. पण उपायच नसतो.  ठेचून मारले तरी ती लवकर मरत नाहीत म्हणे.  तसा प्रयत्न कधी केलाही नाही. त्यांचं  डोकं जरी तुटले तरी ते जिवंत राहू शकतात कारण ते तोंडाने, नाकाने श्वास घेत नाहीत असे वाचल्याचे आठवते. लक्ष्मण-रेषा काही मिळाली नाही पण कसलीतरी किटकनाशक  पावडर मात्र मिळाली आणि एकदाची त्यांच्यापासून सुटका झाली. 

कधीकधी पाईप मधून येणारी मोठी-मोठी झुरळे तर कधी रात्री अचानक  उठल्यावर एकामोगोमाग दिसणारी  छोटी छोटी झुरळे. आणि मग नकळत   आठवते ती शांता  शेळकेंची कविता.  त्यांना एवढी छान कल्पना कशी सुचली असेल नाही? मुलाला तर ही  कविता खूपच आवडते.  


झुरळांची कविता               ………  ... शांता शेळके

रोज रात्री आमच्या घरात
झुरळांच्या लग्नाची निघते वरात

झुरळांचं बिऱ्हाड खूपच मोठे,
मोठ्यांसंगे निघतात छोटे

तोऱ्यात चालतात विहीणबाई,
मागे बिचारी नवरीची आई

नवरदेवांच्या थरथर मिश्या
मुंडावळ्याच शोभतात जश्या

नवरी नेसते तांबडा शालू,
म्हणते दागिने कुठले घालू

झुरळांची वरात घरभर फिरते
कपाटाखाली अलगद शिरते

झुरळांच्या घरात मेजवानी काय,
थोडेसे खरकटे थोडीशी साय

फ्रिजमधली हवा थंडगार छान
नवरानवरी गाठतात माथेरान छान


झुरळाशी आपलं नातं कितीही कडवट असलं  तरी  आमने-सामने झालं कि  कविता  हमखास आठवते आणि  हास्याची एक लकेर हलकेच उमट्वून  जाते. 

१६ जाने, २०१३

हाँ आखिर हमने जीना सिख लिया

 

पलट के देखती हु तो जिंदगी के पन्ने
१० पन्ने   चलते चलते स्कुल के दप्तर(bag) का बोज कभी बोज नहीं लगा
20 पन्ने  तक कालेज-करीअर  में पता ही नहीं चला
30 वे पन्ने  तक दिलका दिल से मिलन हुआ और कब  साथ-साथ  चल पड़े पता ही नहीं चला
40 वे पन्ने  तक पहुँचते-पहुँचते जिगर का टुकड़ा   बड़ा होने लगा और कहने लगा 'माँ ये आपके लिए', भर आती  है ऑंखे उसे  देखकर
हाँ,   फिरभी  हमने तो जिना  कब का ही  सिख  लिया उन अपनों के संग

पलट के देखती हु जिंदगी के पन्ने
मेरी  कुछ यादें आप सबके  पास पड़ी है
आपने आपके जिन्दगीके दिए हुए लम्हे  अभी भी याद  है और याद रखना चाहती हूँ 
उन लम्हों को पीछे  छोड़कर कबकी आगे आ  गई है जिंदगी
हाँ फिरभी हमने तो  जीना  सिख ही लिया ना  उन यांदो के  संग

पलट के देखती हु जिंदगी के पन्ने
कभी गहरी धुप थी, कभी हल्किसी छाव थी
कभी समुन्दरकी  लहरों ने  अपने आपमें समाना चाहा  तो कही लहरे किनारेसे ही वापस चल दी
मत्सर को, प्रेम को , ईगो  को, जेलसी को अपने ही फ़िल्टर से दुसरोंको देखना चाहा
उनका नजरिया कभी समज़ ही न पाई
हाँ फिर भी तो हमने जीना सिख लिया ना  उन  के अटूट  विश्वास के संग

रुक के देखती हूँ
तो लगता है जिंदगी में चाहिए वो  मिला फिर भी क्यों लगता है उन्हें खोने का डर
कभी माँ -बाप को खोने का डर
कभी अपनों को खोनेका डर
कभी अपने आप को खोने का डर
हाँ फिरभी हमने तो जीना सिख ही लिया ना उस डर के संग

फिरभी , क्यू  ऐसा लगता  है
लगता है  के,    .......................  लगता है के  ........................

जिंदगी................. थम सी  जाये  इस मोडपर!!!!!!
                                                    

 

५ जाने, २०१३

नूतन वर्षाच्या उंबरठ्यावर - नात्यातलं टेंशन


 

नवीन वर्ष सुरु झाले नाही का? संकल्प करायचा राहूनच गेला की ? सरत्या वर्षात  आयुष्यात कित्येक गोष्टी घडल्या. म्हणता-म्हणता आता परदेशात  स्थिरावता वर्षही होत आले. . विमानप्रवास हि सारखा घडला. दुबई फिरताना    TOP   OF  THE WORLD  फिरता आलं.  वडिलांचे छत्र नाहीसे झाले आणि आयुष्यात दु:खद , कधीही न भरून निघणारी एक पोकळी  निर्माण झाली .
प्रत्येक टप्प्यावर  नवीन जुळणारी नाती आणि त्यांना जाणून घेताना आपणही एकप्रकारे सज्ञान होत असतो नाही?   माणसाचं  अस्तित्व जगात सारखच जाणवतं.   मानवी प्रश्न मुल्यान्प्रमाणे, लिंगाप्रमाणे, किंवा भौगोलिकदृष्ट्या काही बदलत नाहीत. ते सारखेच राहतात. जन्माची, वाढण्याची आणि मरणाची प्रोसेस  सगळीकडे सारखीच असते. तसेच आनंद  आणि दुखं ही सगळीकडे सगळ्यांना एकसारखीच असतात. रोजच्या आयुष्यात टेन्शन हे तर अटळच.

कधी कधी छोट्या-छोट्या गोष्टींमुळे येणारं टेंशन, काही केल्या त्यातून बाहेर येणे खूप अवघड होऊन जाते.
 गोष्ट कितीही क्षुल्लक वाटली तरीही मनातून विचार काही केल्या जात नाही.
सहवासातल्या व्यक्तींमुळे, आप्तांमुळे येणारं टेंशन.   असं ती/तो कशी वागू शकते? मी तर अशी वागली नव्हते ? मग तीनेच का बरं असं वागावं ? मी किती जमवून घेणाचा प्रयत्न केला पण व्यर्थ. ती/तो तशीच आहे. यापलीकडे मी काही करू शकत नाही. तिनेच मला समजून घ्यायला पाहिजे. नको त्यापेक्षा मी लांबच कशी राहते मग न जमण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आमचे आम्ही बरे. तुमचे तुम्ही बरे. मेंदू ठरवतं कि अग positive विचार कर , sportingly घे. विसरायचं प्रयत्न कर, मनातून काढून टाक, पण नाहीच.
 
 
बापरे! काय हे मन? कसं  समजावू त्याला?  आटोकाट प्रयत्न केला पण छे. किती हा नात्यांमधला  ताण!
 
कधी इतरांचे मन जपण्यासाठी मनात नसतानाही कराव्या लागणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर  कधी केवळ आपण आनंदी असल्याचा देखावा करून समोर कराव्या लागणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर कधी वाढत्या वयाप्रमाणे सहन न होणाऱ्या गोष्टीमुळे येणारा ताण, तर कधी जोडलेल्या नात्यांसाठी करावी लागणारी तडजोडी मुळे येणारा ताण, तर कधी केलेल्या उपकारांची जाणतेपणे जाण ठेवण्यासाठी चाललेली धडपडी मुळे नकळत येणारा ताण , तर कधी केवळ मनात आले म्हणून कराव्या लागणाऱ्या कृती आणि त्यातून मिळणारे समाधान पण तरीही जाणवणारा ताण, कुठली कृती श्रेष्ठ आणि कुठली अश्रेष्ठ,  कुठलं चूक आणि कुठल बरोबर यात चाललेली मनाची घालमेल आणि त्यामुळे येणारा ताण.
 
हा ताण कायम कुठल्यातरी नात्याशी व स्व:ताशी  जोडलेला असतो. कर्मधर्म संयोगानं जुळलेलं नाते टिकवण्यासाठी कधी दुरूनच हाय आणि बाय एवढंच बरं वाटत असतं, कधी नात्यात मोकळेपणा  नसला तरी मनातून प्रचंड आदर असलेले आदराचं नातं टिकवावसं वाटतं, तर कधी केवळ जुन्या मैत्रीखातर तिचं असंबद्ध बडबड ऐकूनही जपावं वाटणारं मैत्रीचं नातं, तर कधी गोष्टी पटत नसतानाही न सोडावसं वाटणारं वा न सोडता येणारं बांधलेले आप्तस्वकीयाचं   नातं,  तर कधी एखाद्या दिवशी अगदी जीवापलीकडचे वाटणारं नातं दुसऱ्या दिवशी विनाकारण फिकं-फिकं वाटणारं मैत्रीचं  नातं, आपल्या सहवासात असताना जीव लावणारी, पण स्वतःच्या कुटुंबात गेल्यावर मी तुझी कोणी नाही असा भासवणारी छोट्या मुलांची नातीही अनपेक्षित धक्का देतात.
       

प्रत्येक वेळी कितीही ठरवलं मनानं ठरवलं तरीही मनाला खुपलेली  एखादी  गोष्ट काढून टाकणं  खूपच अवघड होऊन जातं. कधी एक दिवस तर कधी कित्येक दिवस, तर कधी कित्येक महिने-वर्षे  त्या खुपलेल्या  गोष्टीचं भुणभुण मनात राहतं.
कितीही विचार केला कि इतरांबद्दल racket (racket म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल मनात सारखी चालू असलेली कम्प्लेन मग ती कधी स्वतः बद्दल असते किव्हा इतरांचीही असते) चालवायचे नाही तरी त्यातून बाहेर येणे किती अवघड वाटतं नाही? केवळ अपेक्षा हेच कारण असावं म्हणून त्याबरोबर येणारं अपेक्षाभंगाच दुखःही सहन होत नसावं. मीपणा प्रत्येक वेळी आडवा येतो. मन हे meaning making machineआहे हे माहित असूनही आपल्या विचारा प्रमाणे अर्थ लावण्यात मनाला  एक वेगळच समाधान  मिळत असतं. मनातल्या  little voice  ची भुणभुण सारखी चालू राहते.  आयुष्य stuck झाल्यासारखे, जखडल्यासारखे वाटते.

पूर्वी अगदी छोटी-छोटी कामेही करताना एक प्रकारचा उत्साह असायचा, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद वाटायचा. सगळी कामं  आरामात न कंटाळता केली जायची, पण मग हल्ली असा का होतं बरं? छोट्या-छोट्या गोष्टी सहन होत नाही, स्ट्रेस लेवेल वाढते, चिडचिड होते, आपल्याच मुद्यांवर ठाम राहावंसं वाटतं, stubburn व्हायला होतं. असं परत होऊ द्यायचं नाही असं मनात ठरवूनही परत तसच घडत राहतं आणि अचानक सरत्या वर्षाची शेवटची संध्याकाळ समोर उभी ठाकते आणि मग विचार करू लागते या वर्षी घडलेल्या घटनांचा मागोवा  घेऊ लागते. हे वर्ष चांगलं  होतं  कि वाईट. या वर्षी नाती दुरावली कि जोडली गेली?
नव्या नाती जुळवताना त्यात नवलाई असल्यामुळे नातेसंबंध वाढवण्याचा उत्साह वाढलेला असतो, तर जुन्या नात्यांमधली जवळीक तितकीशी वाढलेली नसते किंवा काही नाती दुरावलेलीही असतात.
सहवासातत्या प्रत्येक चांगल्या-वाईट व्यक्तींमध्ये नक्कीच असे सद्गुण सापडतात जी ज्याचा लवलेशही आपल्याकडे कधीकधी सापडत नाही. मग काही गुणांकडे दुर्लक्ष केले तर नात्यात कधी दुरावा भासणार नाही हेही मनाला पटू लागते.
 मग कुठेतरी शिकल्याचं आठवतं. गांधीजींनी आधी  declare  केले कि 'चले जाव ' हे सगळे  पुढे कसे होणार, काय घडणार  हे त्यांनाही माहित नव्हते. पण possibilities  आपोआप उघडत गेल्या actions  आपोआप घडत  गेल्या  आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे आपण आपल्या आयुष्यात नक्कीच वापरू शकतो.

DECLARE by  words  ----> POSSIBILITIES automatically open


 नवीन वर्षाचे resolution नव्या जोमानं लिहून काढायचे ठरवते.  त्यात हा एक संकल्प कि होऊ वाटणाऱ्या गोष्टी आधी शब्दाने declare  करायच्या, समोरचे दरवाजे आपोआप उघडतील.

नवी नाती फुलवताना जुन्या नात्यांमधील ओरखडे पुसण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. काळाने दुरावलेल्या, कधी विसरलेल्या, तर काही जाणीवपूर्वक दूर सारलेल्या नात्यांमध्ये एक नवीन पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करेन हा हि  अनेक संकल्पापैकी एक संकल्प .


 

९ डिसें, २०१२

किटी पार्टीतील गमतीजमती

 

पुण्यात असताना दिवस कसा जायचा ते कळायचं  नाही. सकाळी ११ वाजेपर्यंत सगळी कामं  आवरून झाल्यावर (अर्थात कामवालीच्या मदतीने) अगदी  १-२ तास, मुले घरी येईपर्यंत निवांत वेळ असायचा. सोसायटीतल्या मैत्रिणी बऱ्यापैकी  एकाच एजग्रूप मधल्या. 'career oriented  वरून ' home oriented' कडे  झुकलेल्या. मग कधी रुचीकडे, तर कधी जुहीकडे, तर कधी माझ्याकडे  चहा पार्टी असायची.   किटीत १३-१४ जणींचा  ग्रुप होता. पण  रोजच सगळ्यांना येणे जमत नसले तरी  ७-८ जणी  एकत्र जमल्या कि  रोजच्या गप्पा, मुलांवरच्या, घरातल्या, तब्येतीबद्दलच्या गप्पांना उत येत असे. नाहीतर मग  पुढच्या किटी पार्टीची चर्चा.  पण दीड-दोन तास वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही.
गप्पाटप्पांच्या  ओघात  खळखळून हसणेही  व्हायचे. मनावरची  मरगळ हलकेच दूर व्हायची.   मन मोकळे करायला  मिळायचं.

तर हि किटी महिन्यातून एकदा ठेवली जायची.  (बाकी क्लबातल्या  पत्यांच्या  हाय-फाय किटी प्रमाणे नाही हं!!)    'भिशी' हे  नाव जरा कसतरीच वाटतं नं ,  म्हणून 'किटी' हा सोज्वळ शब्द. किटीत ना  नवऱ्याची लुडबुड, न पोरांचा गोंधळ. जिच्या घरी किटी असेल ती काहीतरी थीम ठेवायची आणि सगळ्यांनी त्या थीमला अनुसरून काहीतरी करून यायचे.  जसे की  पहिल्या वर्षी  विविध रंगांच्या लाल, निळा, हिरवा, गुलाबी   सगळ्या  रंगांच्या थीम ठेवून झाल्या.  सगळ्या जणी  एकाच रंगात  तयार होवून आल्यावर किटीचे  माहोल अगदी कोणाकडे सण -समारंभ  असल्यासारखे वाटायचे,           किटी   असणाऱ्या  मैत्रिणीची  पहाटेपासूनची  लगबग तर विचारायलाच नको. चार-आठ दिवस आधीच तिची तयारी चालू असते.

दुसऱ्यांदा   अगदी ऋतूप्रमाणे थीम ठेवायचे ठरले.  जसेकी श्रावणात वैशालीची थीम होती एम्रॉयडरी आणि मेंदी. मग काय  विचारता. बरेच दिवस एकमेकींच्या हातावर मेंदी फासणे, सराव  करणे सुरु झाले. पण काहींना मेहेंदी काढताच येत नव्हती. मग सगळ्यांनी ठरवले कि मेहेंदी काढणाऱ्यालाच बोलवूया.  आदल्यादिवशी शोप्पिंग माल मधल्या  मेंदी काढणाऱ्याला  बोलावून  सगळ्यांचे हात एकाच दिवशी रंगून झाले. दोन्ही हात मेंदीने  रंगले असल्यामुळे,   स्वयंपाकाला   मात्र त्या दिवशी रात्रीची  हक्काची विश्रांती मिळाली. पुढच्या दिवशी-किटीच्या दिवशी मेंदीच्या भरगच्च रंगलेल्या हातां बरोबर,  आमची पार्टीही,  मेहेंदीच्या लाल रंगात  अधिकच गडद  रंगली.

 मधूने  तिची थीम ठेवली होती ' केशभूषा hairstyle ' मग काय विचारता? दिवसभर एकमेकींच्या केसांशी खेळ सुरु झाले. कधी पार्लरमधून, तर कधी नेटची मदत घेवून, तर कधी इतर मैत्रिणींची मदत घेवून  भरपूर   हेअर-स्टाईल  शिकून झाल्या. कॅर्लर-स्त्रेटनरची खरेदी झाली. काही जणी जसे मीनल, नेहा, सिमरन, आनंदिता   थीममध्ये  परफेक्ट उतरण्यात अगदीच निष्णात.  डोक्याच्या केसापासून अगदी पायाच्या नखापर्यंत पूर्ण थीम प्रमाणे बेमालूम सजून येणार.   ( नखशिखांत म्हणतात नाही का? मराठी शब्दच पटकन  आठवत नाहीत आणि कधी कधी मराठी ऐवजी इंग्रजी शब्द - over time  pregnant, project , delivery, maintainance, tour इ  अनाहतपणे तोंडात येतातच)  एकमेकींपासून प्रेरणा घेऊन सगळ्याजणी थोडे फार का होईना थीमप्रमाणे तयार होवून यायच्याच. कधी school -girl  बनून जायचे असायचे, तर कधी मिनी-मिडी मध्ये, तर कधी इंडो-वेस्टर्न स्टाईल, ग्रीष्मात फक्त सुती कपडे,  तर कधी बांधणी प्रिंट तर कधी प्रांताप्रमाणे पारंपारिक पेहराव, तर कधी ग्रामीण पेहराव.

एकदा प्रीसीने   थीम ठेवली  होती  wedding.  लग्नाच्या वेळचा आपापला पेहराव करायचा होता.   सर्वांना   नवरी  बनून जायचे होते  आणि प्रत्येकीने  लग्ना बद्दलची एक-एक गोड-कडू आठवण सांगायची  होती. सगळ्याजणी साधारण २५-३८ वयोगटातील होत्या प्रत्येकीला आठवणी सांगताना त्यावेळच्या क्षणांची अनावर  आठवण झाली आणि तेवढ्याच भावूक झाल्या. आनंदिताने सांगितले' तिच्या लग्नाच्यावेळी सर्व व्यवस्था वधूपक्षा कडे होती. नवरा मुलगा केवळ वर-पक्षाच्या खोलीत  झुरळे  सापडली म्हणून  घरची मंडळी त्याला बोहल्यावर चढवायला तयार नव्हती.   मग सगळी साफसफाई करून दिल्यावर तयार झाले म्हणे.  संध्याकाळी ठरलेले लग्न रात्री उशिरा लागले.  एकीने  सांगितले' फिरायला गेले असताना नवरी घोड्यावरून पडली म्हणून खुदकन हसणारा तिचा नवरा, नंतर त्याने तिची  माफी मागितली ती गोष्ट वेगळी.  रुचीने तर तिच्या पतिराजांना एकदम लग्नातच बघितले. आधी फोटो पाहूनच लग्न पक्के झाले होते. नव्या नवरीचा अनुभव प्रत्येकीला केव्हाच   ५-१५ वर्षे मागे घेवून गेला होता. एकमेकींच्या भावविश्वाशी जवळीक साधता-साधता  ३-४ तास कसे संपून गेले ते कळलेही नाही.

सिमरनची थीम होती प्रत्येकीने एक व्यक्तिचित्र  बनून जायचे होते. माधुरी 'माधुरी  दिक्षित' बनून आली होती, जुही ' बिपाशा बसू',  मीनल 'झीनातामान'  आनंदिता  'परवीन बाबी' वगेरे.  त्यावेळी प्रिसि मुळची, तामिळनाडू मधील  असल्याने 'जयललिता' बनली होती  आणि तिने एक छानदार  भाषणही  ठोकले. तिने   तिच्या मंत्रालयात आम्हाला  कुणाला  शिक्षणमंत्री केले तर कुणाला पंतप्रधान, तर कुणी शेतीमंत्री झाले. प्रत्येक जण आपापले खाते सांभाळण्यात कसे निष्णात आहेत हेही तिने भाषणात  सांगितले.
 वैशालीने तर कहरच केला. प्रत्येकीची नक्कल तिने अगदी हुबेहूब उतरवली.   रोजच्या संभाषणात  एकदातरी उच्चारली जाणारी वाक्ये त्यांचाच स्टा इल मध्ये,   तिच्या तोंडी ऐकून दिलखुलास हसलो. जसे कि
मीनल ----'पर्ररर्र ' हा  शब्द तिच्या बोलण्यात  रोज एकदातरी यायचाच.
रुची -------' मेरे अंशू को भी थोडा रखना यार ?'
आनंदिता  ------' ए रिशिका और शुभांगी ने तो मेरे नाक मे दम कर रखा  है'
खालिदा -----' फिरोज को तो ऐसा नही चलता'
माधुरी ----- ' नाही गं, आज ह्यांना  दुपारी  डबा द्यायचाय  नं!!!'
जुही ---- ' रुक न यार. बस और पाच मिनट, ओ मोटी कैसी है रे तू ?'

प्रत्येकीची नक्कल अगदी हुबेहूब.



 किटीत खाण्याबरोबर दोन खेळही ठेवले जायचे. खाण्याची तर खूपच चंगळ असायची. महिन्यातून एकदा प्रत्येकीच्या हातची चव चाखायला मिळायची. १२-१५ महिन्यातून फक्त एकदाच जेवणाचा बेत करायचा असल्याने सगळे पदार्थ घरीच करायचे होते, पण पुढे वर्षभर  मात्र इतरांच्या हातचे खायचे होते त्यामुळे किटी साठी जेवणाचा बेत ठेवायला सगळ्याजणी  तयार झाल्या.  बरं , खेळाचे विषय असायचे एका मिनिटाचे जसे कि एका मिनिटात बलून फुगवणे, मेणबत्त्या पेटवणे वगैरे. एकतर स्किल गेम किव्हा लक गेम.

माधुरीने नवीनच करावके सिस्टीम घेतली होती. त्यामुळे तिच्याकडे 'गाण्यांची महफिल' ठेवली होती. काहींनी सुरेल आवाजात, तर काहींनी येईल तश्या जाड्या-भरड्या आवाजात जुन्या मराठी-हिंदी-इंग्रजी  फिल्मी गाण्यांची महेफील मस्तच जमली. जयंतीचा तर गाणं हा तर आवडीचा विषय. तिनेही सुरेल आवाजात गाणी म्हटली. जुनी गाणी दिवसभर मनात रुंजी घालत होती. त्या दिवशी अक्ख्या सोसायटीला नवव्या मजल्यावरून गाणी ऐकू आली असावीत.

एकदा अशीच आमची किटी चालू होती  माझ्याकडे. खेळाचा विषय होता एका मिनिटात " नवऱ्याला प्रेमपत्र" लिहायचे होते कि ज्यामध्ये 'प्रेम' हा शब्द जास्तीत जास्त वेळा आला पाहिजे होता. काही मैत्रिणी वेगवेगळ्या राज्यातील असल्याने आपल्या मातृभाषेतही लिहिण्याची परवानगी होती. सगळ्यांनी दोनचार वाक्ये साधारण किंवा romantic  लिहिली होती. पण एका मैत्रिणीने   खूप गमतीशीर पत्र लिहिले होते.

प्रिय  xxx ,
मै तुम्हे प्यार करती हू
मै तुम्हारे मम्मिसे प्यार करती हू
मै तुम्हारे पापासे प्यार करती हू
मै तुम्हारे भाई से प्यार करती हू
मै तुम्हारे बहन से प्यार करती हू
मै तुम्हे बाथरूम मे प्यार करती हू, बेडरूम मी भी प्यार करती हू
मै तुम्हारे पेन से प्यार करती हू
मै तुम्हारे शर्ट से प्यार करती हू
मै तुमसे प्यारही प्यार, बहुत प्यार करती हू

उत्तराने सगळ्या पत्रांचे वाचन केले. तिच्या पत्राचे सामुहिक  वाचन झाल्यावर सगळ्यांजणी  अगदी हसून-हसून थकल्या. आणि तिच्या पत्रात 'प्रेम' हा शब्द जास्त वेळा आल्याने अर्थात तिला गिफ्ट देण्यात आले. परत एकत्र भेटलो कि हा विषय वारंवार निघत असे. आणि आम्ही परतपरत पोट धरून हसत असू, हा विषय अगदी महिनाभर पुरला.


आणखी काही दिवसांनी 'knowledge club ' सुरु केला. यात प्रत्येक खेपेला एक विषय घेऊन  जसे कि स्वास्थ्य, स्त्रियांचे मानसिक-शारीरिक आरोग्य, आयुर्वेद, ऋतुमानाप्रमाणे होणाऱ्या आजारांवर घरगुती उपाय, योग आणि योगासने, मुलांचे प्रश्न हळूहळू एक-एक विषय सुचत जावू लागले आणि 'knowledge club 'चा पसारही वाढला.

नंतर  ठरवलं  कि आपल्याकडून काहीतरी समाजकार्य झाले पाहिजे. मग भारतीने एक छान कल्पना लढवली. दर महिन्याच्या ठराविक तारखेला आम्ही अख्ख्या  सोसायटीतले न्यूज-पेपर गोळा करू लागलो आणि मग महिन्याची रद्दी, रद्दीवाल्याला विकून जमा होणारी  रक्कम सामाजिक संस्थेला देणगी स्वरुपात देऊ  लागलो. ह्या कामातही सगळ्यांनी थोडाफार का होईना आपापल्या परीने खारीचा वाटा  उचलला होता.

 प्राथमिक शाळेतल्या बालिश  मैत्रिणी, माध्यमिक शाळेतल्या जाणीवपूर्वक झालेल्या मैत्रिणी, तर कधी कॉलेजच्या, ऑफिसच्या मित्रमैत्रिणी, आणि  आता ह्या किटीच्या मैत्रिणी  वेगवेगळ्या वळणांवर  भेटणाऱ्या  मैत्रिणी ज्यांच्यात आपण कधी एकरूप  होऊन जातो ते  कळतच नाही. रुसवे-फुगवेही व्हायचे पण डान्स -डिब्बा  पार्टीनंतर (तीही कधीकधी व्हायची कि ज्यात फक्त डब्बा नी डान्स अंतर्भूत होतं ज्यात रुसव्या-फुगाव्यांनाही वाट मोकळी करून दिली जायची )  पुनःश्च   एकत्र येणाऱ्या  मैत्रिणी.

मैत्रीचे विश्वच आयुष्यातला एक  सुखद  आपसूक उघडणारा कप्पा   असतो नाही ,  मैत्रीच्या पुस्तकाची पाने पुढे वाढत राहिली तरी मागे उलटून पहावीशी वाटतातच !!!


  

३ डिसें, २०१२

दुबई ....... १

 

अबू-धाबी वरून दुबईला ट्रीपला निघताना दुबई बद्दल खूप उत्सुकता होती. अबुधाबिवरून १२५-१५० km अंतरावर दुबई असल्याने  अगदी दीड तासात दुबईला पोहोचता येते कारण इकडे गाड्यांना  वेग फार असतो आणि दुबई-अबुधाबीला जोडणारा शेख झायेद रोड हा सात पदरी रोड असल्याने गाड्या अगदी सरळ रेषेत १००-१५०च्या वेगाने सुसाट धावत असतात.
दुबई हे  संयुक्त-अरब एमिरातीमधील सात एमिरातीपैकी  एक एमिरात आहे. अबू-धाबी ही राजधानी असून दुबई, शारजा, फुजैराह,  रस-अल-खैमा, अजमान, उम-अल-खैवन हे इतर एमिरेटस  आहेत.   दुबई  जगातील २२वे सर्वात महाग  आणि  मिडल इस्ट मधील सर्वात महाग पण सर्व शहरांमध्ये आवडते एमिरात आहे.

दुबई ची ओळख म्हणजे  ग्लोबल शहर, प्रवासी शहर, उंच उंच इमारतींचे,  सोन्याचा धुर निघणारे शहर, बॉलीवूड लोकांचे आवडते शहर, अंडर-वल्ड लोकांचे शहरही असे ऐकिवात आहे. अबू धाबिवरून दुबईला निघताना रस्त्यावर  त्याच्या काही टिपलेल्या मुद्रा. गाडीतून फोटो घेतल्याने तेवढी सुस्पष्टता  नसावी. प्रत्येक इमारतीची रचना किती वेगळी आहे. पत्त्यातल्या गगनचुंबी  इमारतीच  जणू.  बिल्डींग  आर्की टेक्चर चे अदभुत नमुने. (u can increase photosize by pressing "ctrl +")
 
 
अल-दार -worlds first circular skyscraper on abudhabi-dubai road




वाकडीतिकडी बिल्डींग, नाव माहित नाही.

 

 

 


 

बुर्ज अल-अरब  

बुर्ज-अल-अरब हे   दुबईतील ७-स्टार हॉटेल आहे. याला ७० मजले असून,   २००९ पर्यंत जगातील सर्वात उंच हॉटेल होते. आता ते जगातील चौथ्या क्रमांकावर आहे त्याचा आकार जहाजाच्या शिडासारखा आहे.. जुमेरा बिच पासून  २८० मीटर अंतरावर  कृत्रिम बेटावर हे हॉटेल   वसवलेले आहे. येथे कॉफी पिण्याचा खर्च आहे फक्त ३२५ दिरहाम म्हणजे   १५x ३२५  रुपये. एका वेळचा डीनरचा खर्च तर विचारूच नका.  निळा रंग मध्ये-मध्ये असलेली हॉटेलची हि पांढरी-शुभ्र अवाढव्य   इमारत बघून खरेच प्रसन्न वाटले. बाजूलाच वाडी पार्क नावाचे water  park आहे. इथेही फिरंगी लोकांची खूपच गर्दी दिसते.

 
येथून बाजूलाच अमिराती कल्चर असलेले  मदिनत सुक (madinat souk market )  एक खरेदीचे केंद्र. उच्च दर्जाचे हॉटेल्स आणि बार्सही  आहेत.  या बाजारात जगातील उत्तमोत्तम वस्तू पण जरा महागच मिळतात.   त्यामुळे विंडो शोप्पिंग केलेलीच बरी. युरोपियन लोकांची  येथे खूप गर्दी दिसली.
या बाजारातील काही  फोटो 
 
दिव्यांनी सजवलेला एक स्टाल  
शॉपिंग सेंटर मधील आरामात पहुडण्याचे  एक ठिकाण 
हुश्य !!!  इथे मात्र चालून चालून थकलेल्या पायांना  बीन  बग वर बसून जरा आराम मिळाला. 
 
 

हॉटेल अटलांटिस 

हे आहे पाम जुमेरा नामक कृत्रिम बेटाचे  एक चित्ताकर्षक  दृश्य. पाम जुमेरा हे एक  पाम झाडाच्या आकाराप्रमाणे  पाण्यात तयार केलेले एक बेट . त्याला १६ फांद्या असून त्यावर व्हिलास वसवले आहेत. गोल दिसणारा क्रिसेंट आणि त्याच्या टोकाशी अटलांटिस हॉटेल.  पाम  जुमेराचा हा  वरतून दिसणारा view . यात म्हणे मोठ्या बॉलीवूड स्टार  लोकांचीही घरे आहेत. पाम  जुमेरा हे स्वतःच स्वताला 'जगातील आठवे आश्चर्य' म्हणवतात.
 
 पाम जुमेराच्या   शेवटच्या टोकाला अटलांटिस  हॉटेल आहे. एका बाजूला अटलांटिसची  भव्य-दिव्य लखलखती  इमारत आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या-मोठ्या दगडांच्या पलीकडे पसरलेला अथांग समुद्र.  येथे डॉल्फिन शो, वाटर पार्क आणि शॉपिंग सेंटर आहे. येथून मोनोरेलने पाम जुमेराच्या एका टोकापासून दुसऱ्या  टोकापर्यंत ५.४ किमी जाता येते.  मोनोरेलने पाम जुमेराचा दिसणारा view मनात साठून ठेवावा असा.
 
 
समुद्रकिनारी फेरफटका मारून झाल्यावर मोनो-रेल ने प्रवास केला. मोनोरेल आणि मेट्रो रेल मधील फरक अनुभवला!!!!  तसा आत विशेष फरक नाही पण मोनोरेल एकाच पठरीवरून चालते पण तिचे बीम हवेत उंच असतात. फिरताना कधी रात्र झाली ते कळलेही नाही.  मॉंल मध्ये जेवायला गेलो खरं, पण बर्गर, पिझ्झा असले खावूनच उदरभरण केले. शाकाहारी लोकांची फार पंचाईत होते. ७०-८०% लोकं इथे (expat ) दुसऱ्या देशातील असल्याने  अगदी सगळ्या प्रकारचे options जसे कि इटालिअन, मेक्सिकन, फिलिपिनी, थाई सगळ्या प्रकारचे जेवण, बहुतेक non veg  मिळते.   भारतीय हॉटेलेही आहेत. पण शोधावी लागतात.
 
 
 
बुर्ज -खलिफा - TALLEST MAN-MADE STRUCTURE IN THE WORLD

उंची ८२८ मीटर, २०० वर अधिक मजले


दुसऱ्या दिवशी बुर्ज खलीफाचे सकाळी ११ वाजताचे बुकिंग आधीच करून ठेवले होते. हि जगातील सर्वात उंच बिल्डींग असून तिच्यात २०० च्या वर  मजले आहेत. रांगेत प्रतीक्षेत असताना अरबांच्या हातच्या कॉफीचा मस्त आस्वाद घेत  होतो. लिफ्टच्या परिसरातच बुर्ज-खलिफा व इतर जगातील उंच टोवर बद्दल माहिती देणारे बोर्ड  दिसतात. २५-३० मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर एकदाचे लिफ्ट पर्यंत  पोहोचलो.


 बुर्ज खलिफाच्या १२४व्या मजल्यापर्यंत लिफ्ट जाते  तेही अवघ्या  १ मिनिटात. लिफ्ट मध्ये १ ते ६० सेकंद मोजेपर्यंत १२४व्या मजल्यावर लिफ्ट कधी पोहोचते ते समजतही नाही. कानात मात्र,  विमानात असताना जसे जाम झाल्यासारखे वाटते ना,    तसे वाटले क्षणभर.   १२४ व्या मजल्यावर पोहोचल्यावर   वाटलं,  काय विमानातूनही दिसते तसेच खालचे चित्र दिसत असेल. पण जमिनीवर राहून "Top of the world from the Land" पाहण्याची मजा काही औरच असेल नाही?observation deck  वरून ३६० degree  गोल चक्कर मारता येते. वरतून दिसणारे दुबई शहराचे दर्शन खरोखरच मनात साठून राहते. वरतून टिपलेली काही चित्रं . (u can increase the photosize by pressing "ctrl +")

 
गगनचुंबी इमारती  
 
 
 रस्तांचे जाळं ,  मध्यभागी बारीकशी दिसणारी मेट्रो
खाली दिसणारा शेख झायेद रोड 


 ही  बिल्डींग तयार होताना लागणाऱ्या गोष्टींची माहिती येथील बोर्ड दर्शवतात. जसे कि
----- एकावेळी ८० देशाचे १२००० कामगार पिक पिरीअडला काम करत होते,
----- एकूण ५७ असलेल्या लिफ्ट्स,
----- २८,००० च्या वर लागलेले ग्लास पँनल्स,
----- ९५ कि.मी. परिसरातून  कोठूनही दिसणारे बुर्ज खलीफाचे वरचे टोक इ.

 

 हा आहे दुबईचा राज्यकर्ता. शेख महम्मद बिन राशीद अल मक्तूम आणि त्याने वर  लिहिलेले मस्त quote

"The word impossible is not in the leader's dictionaries
No matter how big the challenges, strong faith, determination
and resolve will overcome them."



 





 
फोटो घेण्यात व्यस्त असलेले बाप-लेक, मागे  लिफ्टमधून परत खाली जाण्यासाठी  असलेली रांग.
 




बुर्ज खलिफाच्या समोरच दुबई मॉल मध्ये  एक मोठे संगीतावरचे  कारंजं  आहे. रोज संध्याकाळी ५ मिनीटांचा शो असतो. हिंदी गाण्यावरही कधीकधी शो असतो.
 

रस्त्यावर झाडांना केलेली रोषणाई.
 


बुर्ज -खालीफाचे प्रवेशद्वार , येथे शिल्पा शेट्टीचे राज कुन्द्राने गिफ्ट दिलेले  लक्झुरिअस अपार्ट मेंट आहे म्हणे
 
रात्री दिसणारी बुर्ज-खलिफा 
 

 
                                                 .................................... क्रमश: