१७ जुलै, २०१३

चंद्रावरचं आपलं वजन



नुकतीच उन्हाळ्याची जुलै- ऑगस्टची सुट्टी लागलेली.  असाच उन्हाळ्याच्या सुट्टीचा एक दिवस

हर्षल  :मम्मा  आज  काहीतरी चांगलं कर ना ?

मम्मा : शंकरपाळ्या करू ?

चालेल !

पटकन तयारी झाली , शंकरपाळ्या तळणे चालू  पण तोंडात मात्र मोजून  २-३……………….  च जातायेत तेही चव पाहण्यासाठी (कॅलरी  कॉन्शस ????????????)

तूप, साखर, अणि मैदा पण. २०० अधिक १०० अधिक २०० कॅलरीज .......... बाप रे !!!! कधी कधी डायट बद्दलची अधिक माहिती विनाकारण frustration आणते

मनात विचारचक्र चालूच आहे त्याच वेळी हर्षल किचन मध्ये येतो

हर्षल : मम्मा तुझं वजन चंद्रावर किती असेल सांगू ?
मम्मा : किती रे  ?

हर्षल :  फक्त १२. ४१kg    (कारण चंद्राची gravity  आहे  ०.१७)
आणि प्लुटो  वर तुझं वजन किती असेल  सांगू ४ .३ ८ kg (कारण प्लुटोची  gravity आहे  ०.० ६)
…।
……
…….
……….

चंद्राच्या कलेप्रमाणे, दर वर्षी  किलो-किलोने वाढणाऱ्या वजनाची जाणीव नकळत  अस्वस्थ करुन  सोडते

काश !!!!!!! काश !!!!!!! मै  चाँद पे रहती …………………

आपण चंद्रावर किंवा प्लुटो वर राहत असलो असतो तर किती बरं झालं असतं !!!!!!!!!!!!

मनातल्या मनात आपण चंद्रावर आहोत असं स्वत:ला  समजून शंकरपाळ्याची प्लेट केव्हाच रिकामी झाली होती .
 

बाबा


अनंत विश्वातील असलेलं माझं एक छोटंसं  अस्तित्व केवळ आणी केवळ ज्याच्यामुळे  आहे - तो बाबा

इतरांची मदत न घेता  कन्यांची जबाबदारी समर्थपणे पेलणारा -तो बाबा

आचारातून-विचारातून स्वावलंबनाची  शिकवण देणारा - तो बाबा

स्वतः ऑफिसला चालत जावून मुलींना खाऊसाठी चाराणे -आठाणे बाजूला काढून ठेवणारा - तो बाबा

स्वाभिमानानं जगा आणी जगवा  असं शिकवणारा -तो बाबा

चॉकलेट-बर्फी नेहमी  नाही देता तरी आजोळचा कोकणचा मेवा मात्र मनसोक्त खावू घालणारा- तो बाबा

जीवाभावाचा सखा आणि पुत्र ज्यांच्या आशीर्वादामुळे लाभला - तो बाबा

कधीतरी निवांत वेळी आपलं दु:खं  विसरून तबल्यावर बोल वाजवणारा किंवा सतारीवर तार छेडणारा- तो बाबा

अनंतात विलीन झाला   तरी वारंवार   शतश: त्रिवार वंदन करावसं वाटणारा - तो बाबा

आणी हृदयातील  खोल पोकळीचं अस्तित्वही  पदोपदी  जाणवू देणारा - तो फक्त बाबा आणी  बाबाच
...............
...........
........

आज ह्या महिन्यात तुम्हाला अनंतात विलीन होवून एक  वर्ष पूर्ण  होईल. पण ह्या ३६५ दिवसात असा एकही दिवस गेला नसेल कि तुमची आठवण झाली नाही.

आठवण आली कि हृदयाच्या निसरड्या वाटेवर मन हळूच डोकावतं आणि  आसवांची घळघळ आपोआप डोळ्यातून चालू होते  आणि कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबतच नाही. इतकं का खोल असतं  हे प्रत्येक  बाप-लेकीचं  नातं.   मनानं  जोडलेलं  मनातच खोल रुजलेलं.

लग्नांनंतर तर हे नातं  अधिकच भावूक झालं. तुम्ही होतात  तेव्हाही अनावर आठवण यायची, पण आता अस्तित्व संपलं तरी आठवणी काही केल्या संपतच नाहीत. जिवंत  असताना  वाकून नमस्कार करणं कधी जमलं नाही कधी लाजेखातर, तर कधी वाटलं  नाही म्हणून, पण पूर्वीही आणि  आताही  मात्र तुम्हाला शतश: त्रिवार वंदन कायमच मनातून करत राहिले.

तुम्ही असताना हृदयात  एक जागा होती आदराची, प्रेमाची पण गेल्यावर मात्र हृदयात एक मोठी पोकळी निर्माण करून गेलात,........... कधीही न भरून येणारी. या सारखी  दु:खद  भावना यापूर्वी  कधी निर्माण झाली नव्हती. हृदयातील  पोकळीचं  अस्तित्व तुमच्या जाण्यानं जाणवलं अन पावलोपावली जाणवत रहातं.

असं  अचानक निघून जाल असं  कधी वाटलच नव्हतं. तीन महिन्याच्या अवधीत  सगळंच  आटपलं. निमित्त झाले साधं  सर्दी-खोकला, पण पुढे वाढत जावून हॉस्पिटलच्या वा ऱ्या-कफ -लंग्स -किडनी-डायलिसिस सगळं  करुन झालं…………    खूप कंटाळला  होतात  न आयुष्याला. मरणाच्या दाराकडे अगदी खिन्नपणे  टक लावून बसला  होतात.   अन मग एक दिवस सगळंच संपलं  होतं .
…………
……
……


दर वर्षीप्रमाणे शिवरात्रीला,  देवगडला जावून, 'ओम नम: शिवाय' जप ह्या वर्षी करता येणार नाही,  ही  रुखरुख मात्र तुम्हाला शेवटपर्यंत  लागून राहिली होती.