३१ ऑक्टो, २०१२

मुलांना वाढवताना

(better parenting thoughts collection)
 
मुले ही  देवाघरची फुले म्हणतात ते खरेच. पण त्यांना वाढवताना, त्यांचे पालनपोषण करताना  खरोखरच काही गोष्टी नकळत आपल्याही लक्षात येत नाहीत किंवा त्याची परत परत कोणीतरी आठवण करावी लागते. अशीच काही वाचलेली, आवडलेली मुलांबद्दलची   टिपणे :----
 


* शरीरस्वास्थ्य 

 बालपणी कमावलेले शरीर हे fix deposit सारखे असते जे आपल्याला आयुष्यभर साथ देते म्हणून मुलांना पौष्टिक आहार द्या. निसर्गाने दिलेले पदार्थ  आणि कृत्रिम पदार्थ, त्यांचे फायदे-तोटे  यांचे ज्ञान मुलांना द्या.

* गृह्स्वास्थ्य 

मन आणि विचार जागा व्यापत नसल्याने घरातल्या एका कणात सु द्धा जगातले सर्व विचार राहू शकतात. म्हणून घरात कोणाचाही मत्सर करू नये . आपले विचार वातावरणांत वर्षानुवर्षे टिकतात. आणि त्याचा परिणाम मुलांवर होतो.  कारण आपल्या मत्सर शक्तीचा त्रास मुलांना अधिक होतो.

* मुलांना सर्वात मोठे tention (८०%) कोणाचे असते ?

पालकांचे ----- परवलंबीपणाचे, पालकांच्या अपेक्षेचे . मुलांना कपडे, खेळणी  हवे असले तर निवड कोण करणार? आई-बाबा. असच खाल्लं पाहिजे, एवढंच खाल्लं पाहिजे, एवढेच मार्क मिळाले पाहिजेत, असे करू नको ,   हे मुलांना आवडत नाही. या बारीक-सारीक कारणांनीही मुलांना वाईट वाटते. म्हणून मुलांच्या आवडीनिवडी लक्षात  घ्या. चौरस आहाराची मुलांना कल्पना द्या. त्यांच्या निवड कशी चांगली आहे हे त्यांच्यादृष्टीने समजून घ्या.

* मुलांना मारण्यामुळे मुले असुरक्षित फील करतात.

मुलांकडून चूक झाली तर  मुलांना  मारहाण होते पण त्यामुळे मुलांना  असुरक्षित वाटते , मुले घरात, शाळेत कायम भीतीच्या छायेत वावरत असतात. मुलांना न मारता आत्मशासन करा जसे स्वतः न जेवणे,   अबोला धरणे इ .

*मुलांना उपदेश आवडत नाही.

दिवसभर आपण मुलांना या न त्या प्रकारे उपदेशच करत असतो पण आपणही तसे वागतो का?  let your action speak

* मुलगा नीट वागत नाही ?

मुले आई-वडिलांचे निरीक्षण करतात. ते आपली xerox कॉपी असतात. तो चुकीचा शिकला तर दोष कोणाचा?

* मुलगा अभ्यास करत नाही?

घरातील वातावरण मुलांच्या अभ्यासासाठी  पोषक आहे का?  मुलगा अभ्यास करताना घरात शांतता पाहिजे. टीव्ही, गप्पा-टप्पा  बंद.  मुलगा अभ्यास करेल त्यावेळी मीही काही वाचीन, त्याच्या अभ्यासात रुची दाखवेन.

* मुलगा शाळेला दांडी मारतो?

मी ऑफिस मध्ये मस्टरवर सही करून क्रिकेटची match  बघायला जाईन हे बाबांचे बोलणे मुलगा ऐकतो आणि दांडी मारणे हे काही चुकीचे नाही असे तो समजतो  आणि तो ही तसाच वागतो .

* मुले खोटे बोलतात?

अमुक व्यक्तीचा फोन आला कि त्या व्यक्तीला फोनवर सांग कि मी घरी नाही आहे हे मुलांना कोण शिकवतो? आपणच.  मग खोटे बोलणे हे चुकीचे असते हे मुलांना कळणारच कसे?

*मुले गोष्टी लपवायला शिकतात / चोरी करायला शिकतात

मी ऑफिसमधून पेपर,  पेन आणून देईन. कोणाचेही घ्यावे आणि वापरावे हे कोण शिकवतो? आपणच .

* मुले खोड्या काढतात ?

मुलांना त्यांच्यातील शक्ती कोठेतरी वापरायची असते. यांना चांगल्या खोड्या काढायला शिकवा किंवा त्यांची शक्ती इतर गोष्टीत जसे पोहणे, पळणे chanalise करा.

* मुले रागावतात ओरडतात ?

आत्मपरीक्षण करा. आपण रागावतो आहे का? घरात आपण सारखे ओरडतो आहोत का? आपलेही घरातील वागणे तसे आहे का?

* मुलगा स्वार्थी आहे?

स्वार्थ कोण शिकवतो? मुलगा शेजारच्याला चोकलेट , खाऊ  देतो आई म्हणते ते महाग आहे दुसऱ्याला देवू नकोस. स्वार्थ कोणी शिकवला? आपणच ना ?

* मुलगा ऐकत नाही?

मुलांवर अगदी मनापासून प्रेम करा. प्रेम करणाऱ्या व्यक्तीची आज्ञा मुले कधीच मोडत नाहीत.
 

* कृतज्ञ मुलगा हवा?

पालकांनीही वडील-माणसांशी कृतज्ञतेने वागायला हवं. आई-वडिलांना कमी पडले तरी चालेल पण मुलांना पाहिजेच असे आपणच वागतो. मुलेही मोठेपणी तसेच वागतात, आपल्याच मुलांना प्राधान्य देतात.. म्हणून आई-वडिलांचे प्रेम आई-वडिलांना द्या, मुलांचे प्रेम मुलांना द्या.
 

                                                                                              सौजन्य : मन:शक्ती 


२२ ऑक्टो, २०१२

मी कोण ?????




कुठेतरी ऐकलेले आठवते                      




तुम्ही कोण आहात? -----


 -  आपण जेथे राहतो ते घर,
 -  घर जिथे आहे ते गाव 
 -  ते गाव  ज्या शहरात  आहे ते शहर
 -  ते शहर  ज्या राज्यात आहे ते राज्य
 -  ते राज्य ज्या देशात आहे तो भारत देश
 -  भारत देश आणि असे हजारो देश  ज्या खंडावर आहे ते आशिया खंड-
 -  आशिया खंड आणि उत्तर ध्रुव , दक्षिण ध्रुवा  सकट  अनेक खंड  ज्या पृथ्वीतलावर आहे ती पृथ्वी -
 -  पृथ्वी जी बुध, मंगल गुरु, शनी आणि इतर ग्रहांबरोबर  ज्या आकाशमालेत  आहे ती सूर्यमाला,
 -  असे  अनेक सूर्य आणि त्यांचे ग्रह असलेल्या अनेक  सूर्यमाला मिळून  बनलेली  आकाशगंगा
 -  आणि  अस्तित्वात असलेल्या अशा  अनंत कोटी कोटी  आकाशगंगा


असा व्यापक विचार केला तर आपले अस्तित्व  एक पुसटसे बिंदूही  नाही.
तरीपण आपले विश्व हे आपल्या परीघापर्यंतच  मर्यादित राहते आणि त्या परिघात सामावलेल्या व्यक्ती, दिवसभर ऑफिसात/घरात त्यांची  स्क्रिप्टे   उतरवण्यात कायम बिझी-बिझी  असलेलो आपण. 
(whole day we are busy in writing other persons script -  he should not have behaved like this, he should have done like that, he is responsible for that, not I  ...... )

कधी कधी प्रश्न पडतो------

मी कोण???


कधी वाटते-

थबकले उंबऱ्यात मी, पाहुनी नवी पहाट
जणु जन्मले नव्याने, जडता हा मळवट
हाती संसाराचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका


तर कधी वाटते-
बाबांच्या आयुष्याच्या काही शेवटच्या संध्याकाळी  आजारपणात सोबत घालवलेल्या काही रात्री आणि त्याकाळात करता आलेली त्यांची सेवा यातच आयुष्याची धन्यता मानणारी एक भाग्यवान कन्या.

तर कधी वाटते -
जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आणि लाभलेले अनमोल पुत्ररत्न यांच्याशिवाय दुसरे काहीच न दिसणारी घराच्याच चौकटीत अवघे विश्व सामावलेली आणि त्यातच रमणारी एक सामान्य पतिव्रता(??) - माता(नो ?).


तर कधी वाटते -
आयुष्य एकदाच मिळालेल्या जीवनाचा प्रत्येक क्षण नाविन्य उपभोगण्याची अनावर इच्छया असलेली, कायम मैत्रीच्या विश्वात रमणारी, भिश्या, किट्टी पार्ट्या झोड्णारी, मैत्रीचे अनुबंध जोडणारी-जोपासणारी एक सखी

तर कधी वाटते -
रोजच्या धावपळीत तना च्या स्वस्थतेसाठी शारीरिक व्यायाम , मनाच्या शांततेसाठी मानसिक व्यायाम(मेडीटेशन) यातच relaxation शोधणारी एक जागरूक हेल्थ कॉन्शस आधुनिक स्त्री?

तर कधी वाटते-
स्वत:ला आरशात न बघता, स्वतः कडे बोट न दाखवता दिवसभर इतरांचे मात्र script वर script, script वर script उतरवणारी,
स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्यांना बदलवू पाहणारी ,
स्वत: च्या tension ची कारणे स्वत:त न शोधता बाहेर शोधणारी
आणि ही आपली स्वार्थी वृत्ती, पदोपदी जाणवणारी, जगाच्या पदपथावरील एक पामर.

२० ऑक्टो, २०१२

आजोळ एक सुखद कप्पा - कोंकण



आजोळ एक सुखद कप्पा  -  कोंकण 
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हडी नावाचे एक गाव आणि या गावातील जुवा पाणखोल नावाचे छोटेसे   बेट.  बाजूलाच आणखीन एक बेट - त्याचे नावं बंड्या-आणि त्याला लागूनच तोंडवळीचा किनाराही दिसतो.  मालवणपासून जवळजवळ ८ किलोमीटरवर हडी हे गाव आहे. मुख्य रस्त्याला लागून एका आडवळणाने अर्धा km गेले कि लांबूनच जुवा  बेट  दिसते.  या बेटावर अगदी  मोजकीच ३०-३२ घरे आहेत. बेटावरून कुठेही जायचे म्हटले कि होडीशिवाय पर्याय नाही.
 
 
 
 
गाडी किनारी पोहोचताच बेटावर जाण्यासाठी होडीवाल्याला कुउऊ  करून  कुकारे दिल्याशिवाय होडी येणार कशी?
 
 
आता या बेटावर उतरायचे आहे.
 
 
 
आणि नंतर होडीत बसल्यावर ५-७ मिनिटातच बेटाच्या किनारी पोहोचता येते.
 
 
 
 बेटावर उतरल्यावर घरापर्यंत थोडे पायवाटेने चालायला तर हवे.
 
 
पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर लागणारी पायवाट.
 

आणि हे आमचे माडाच्या बनांत लपलेले  छोटेसे टुमदार घर. बाजूलाच दिसणारी खोपी . रस्त्यातच वाळत टाकलेली सोले (आमसुले), मिरच्या, वाल  इ.
 
प्रवासातून थकून आल्यावर आंघोळ तर पहिली पाहिजे नाही का? केवढे मोट्ठे पातेले.विहिरीतून पाणी काढून  चुलीवर तापलेले कढत-कढत पाणी. यात तर सगळ्यांची आंघोळ होईल.
 
 
 
नाष्टा झाल्यावर सकाळी १०-११ वाजता उकड्या तांदळाची पेज, दुपारी मस्त मालवणी  जेवण होते. संध्याकाळी काय करावे बरे?  बाहेर नारळाच्या झावळांनी आच्छ्यादलेला खळा . त्यावर  टाकलेल्या माच्यावर (सोफा) आराम करूया.
 
 

 
 
आम्हा मुलांना  येथून उतरायचेच नाही.  उंच-उंच गवतावर  खूप छान वाटतेय.
 
 
खोपीच्या बाजूला संध्याकाळी भाताची चाललेली मळणी. मध्यभागी खांब रोवून रेड्यांना सलग ओळीत बांधून त्यांच्या पायाखाली भाताची रोपे तुडवून भाताच्या 
साळ्या सुट्या होतात.
 
 
मुलांना  पण रेड्यांच्या मागे पळायचे असते.
 
 
 
 
आज पोहायला जायचे आहे !!!! होडीतून थोडे उथळ जागी  जाऊया कारण पोहता येत नाही ना अजून.
 
 
 
 
 
खाडीच्या पाण्यात डुबक्या मारताना काय मज्जा येते नाही??
 
समुद्रकिनारी वाळूचा किल्ला करतोय कसा वाटतोय??
 
 
संध्याकाळी दिसणारे ढगांनी झाकोळलेले बेटाचे  नयनरम्य दृश्य 
 
उन्हाळ्यातील दिवसात आंबे-फणस  खाण्याची मजा काही औरच.
 
 
 
 
 
 
 
बेटावरील नारळाच्या झाडांनी वेढलेली  भाताची शेते 
 
किना-यावरून दिसणारा सूर्यास्त.....